सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सदैव सभासद , खातेदारांच्या पाठीशी .. श्री ज्ञानदेव रांजणे .

News By - Sahyadri_News
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर / नारायण जाधव .
शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडवण्याबरोबच त्यांच्या उन्नतीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची अंमलबजावणी केली जात असून खातेदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे असे प्रतिपादन सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे यांनी केले .
वाटंबे ता .जावली येथील शेतकरी कै . धोंडीबा गणपत भणगे हे केळघर येथील जिल्हा बँकेचे खातेदार यांचे काही दिवसापुर्वी आकस्मित निधन झाले होते .
त्यांच्या विम्याचा दोन लाखाचा धनादेश त्यांच्या आई जनाबाई गणपत भणगे यांचेकडे सपुर्त करण्यात आला . जिल्हा बँकेच्या वतीने पुढाकार घेऊन त्यांचा वार्षीक प्रिमियम भरल्याने त्यांच्या वारसांना त्याचा फायदा झाला आहे .
यावेळी केळघर शाखा व्यवस्थापक सुर्यकांत चिकणे, वरोशी सोसायटीचे चेअरमन श्री मोहनराव कासुर्डे, केळघर वि .से . सोसायटीचे संचालक श्री नारायण जाधव , जगन्नाथ शेलार यांचेस केळघर सोसायटीचे सचिव आनंदा शेलार, वरोशी सोसायटीचे सचिव दिपक शेलार , विश्वास बेलोशे , प्रदिप कासुर्डे ‘ अक्षय पवार, संतोष शिर्के, तेजस कासुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे म्हणाले जिल्हा बँक सदैव शेतकर्यांच्या ‘ खातेदारांच्या सदैव पाठीशी असुन जिल्हा बँक योजना राबत असुन त्याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले .










