Skip to content

केळघर ग्रामपंचातीचा स्तुत्य उपक्रम . प्लास्टिक बंदिबाबत व्यावसियांना बजावल्या नोटीस .

IMG-20250725-WA0016.jpg

News By - Sahyadri_News

*सहयाद्री न्युज स्टार ११*
  केळघर / नारायण जाधव  .
   केळघर हे बाजारपेठेचे गाव असुन  येथील व्यावसायिकांना दैनंदिन वापरत असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण राज्यात प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे .


या अनुशंघाने केळघर ता . जावली येथील बाजारपेठेतील सर्व व्यवसायीकांना ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्यक्ष नोटीस बजावुन सर्व प्रकारच्या प्लास्टीक  पिशव्या , थर्माकोल व प्लास्टिक पासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या डिस्पोजेबल वस्तु ( ताट, कप्स ,ग्लास, वाटी , चमचे ) , हॉटेलमध्ये पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे भांडी व वाटी , द्रव पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे प्लास्टीक पाऊच कप . , ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीची प्लास्टिक पिशवी . याप्रमाणे बंदी असलेले प्लास्टीक पिशव्या उत्पादन व वापरणाऱ्यास ५००० / रु दंड दुसर्यांदा १०, ००० / रु दंड आणि तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५000/- रु दंड आणि तीन महिन्यापर्यंत शिक्षेची तरदुत असल्याचे नोटीशित नमुद केले आहे .
यावेळी उपसरपंच शंकर गणपत बेलोशे , मा सरपंच सागर भगवान पार्टे , ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गणपत बेलोशे ‘ सदस्या रेखा आनंदा चव्हाण , सौ हिराबाई आनंदा भिलारे, ग्रामपंचायत अधिकारी श्री . शुक्राचार्य विष्णु साळुंखे यांचे सह शैलेश पार्टे , दिपक शिंदे अरुण खोडे , सौ सुकेशिनी बिरामणे , सुजाता गाडवे , लिलावती सल्लक , जयश्री बेलोशे यांचे सह ग्रामस्त उपस्तित होते .

फोटोः प्लास्टिक बंदिबाबत केळघर येथील व्यवसायीकांना नोटीस बजावताना उपसरपंच शंकर बेलोशे, सागर पार्टे ग्रामपंचायत अधिकारी शुक्राचार्य साळुंखे आदी . (छाया : नारायण जाधव )


महाराष्ट्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या प्लासिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र या कार्यक्रमादवारे गांवातील सर्व व्यवसायीकांनी प्लास्टीक पिशवा ऐवजी कापडी व कागदी पिशव्याचा वापर करावा आणि प्लास्टीकचा वापर टाळावा व गांव प्लास्टीकमुक्त करण्यास हातभार लावावा . प्लास्टीक पिशव्या , उत्पादने यांचा वापर करताना आढळून आल्यास आपणा विरुद्ध ग्रामपंचायती मार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल .
  श्री .शुक्राचार्य विष्णु साळुंखे .
  ग्रामपंचायत अधिकारी केळघर तर्फ मेढा .

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे 
वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..
आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
आंबेघर येथील प्रतिपंढरपुर विठ्ठलधाम मध्येही दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
सातारा – जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख .. आ शिवेद्रराजेचा पाठपुरावा ; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी ..
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .
डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
आंबेघर ते आसणीतळ दरम्यानच्या रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण ..
श्रीमती पार्वती जांभळे यांचे स्मरणार्थ जांभळे बुंधुंनी केळघर येथील स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करून एक वेगळा आदर्श दाखवुन दिला . सौ कल्पना तोडरमल
Scroll To Top