Skip to content

बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण
कल्याणराव दळे ; मेढा येथे नाभिक महामंडळाची बैठक

IMG-20250604-WA0019.jpg

News By - Sahyadri_News


केळघर /नारायण जाधव .
बारा बलुतेदारांच्या विकासासाठी सरकारचे उदासीन धोरण असल्याने उपमहामंडळांच्या लाभापासून गावगाड्यातील बारा बुलतेदार समाज वंचित आहे.त्यांच्याकडे सरकारने वेळेत लक्ष देणे आवश्यक आहे अन्यथा आंदोलनच करावे लागेल, असे प्रतिपादन बाराबलुतेदार संघाचे राज्याध्यक्ष व नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले.
मेढा येथे झालेल्या नाभिक महामंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी
  एकलव्य संघटनेचे अध्यक्ष व म्हाडाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे
शेतकरी संघटनेचे नेते व महाज्योतीचे माजी संचालक लक्ष्मणराव वडले नाभिक महामंडळाचे नेते विजय सपकाळ, तालुकाध्यक्ष रविंद्र पवार, माजी अध्यक्ष राजेंद्र निकम , शहरप्रमुख सुर्यकांत निकम , गणेश सपकाळ आदी उपस्थित होते .
कल्याणराव दळे म्हणाले, निवडणुकीपूर्वी सरकारने ओबीसी महामंडळातर्गत 18 उपमंडळांची घोषणा केली. परंतु, व्यावसायिक लाभार्थ्यांना जाचक अटी व शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाभ मिळत नसल्यामुळे बारा बलुतेदार व्यवसाय मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये आला आहे. अजितदादा पवार यांनी हुतात्मा भाई कोतवाल, जिवाजी महाले यांच्या स्मारकांसाठी निधीची घोषणा केली. परंतु, प्रत्यक्षात काहीच मिळाले नाही. अशा सरकारच्या उदासीन धोरणा विषयी आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या आव्हान दळे यांनी केले.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी निर्माण केलेल्या महाज्योती संस्था ५४ टक्के लोकसंख्या असलेल्या समूहातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने शब्द देऊन सुद्धा जाणीवपूर्वक पुरेशा सोयी, सुविधा न दिल्यामुळे मोठ्या संकटांना विद्यार्थ्यांना सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. अशावेळी केंद्र शासनाने निर्माण केलेल्या न्या. रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.
यावेळी नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते होते. प्रारंभी हभप अतुलमहाराज देशमुख यांनी स्वागत केले. महामंडळाचे माजी अध्यक्ष विजय सपकाळ यांनी प्रास्ताविक केले .
अध्यक्ष रविंद्र पवार यांनी आभार मानले.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे साताऱ्यात जोरदार स्वागत … सातारकरांशी साधला संवाद ..
महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार .. बावनकुळे … साताऱ्यासह ४५ जागा निवडुन आणणार .. पालकमंत्री बदल ठरल्याप्रमाणेच ..
अभ्यास , छंद , खेळ या त्रिसुत्रीची सांगड घातली की यशस्वी होता येते .. ओमकार पवार . निझरेतील गणेश विकास मंडळाकडुन शिक्षक व गणवंतांचा सत्कार ..
बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या सुधारित जलनियोजनास मान्यता .. आ . शिवेंद्रसिहराजेंच्या पाठपुराव्याला यश .. १ टी . एम . सी . बोंडारवाडी प्रकल्पावर शिक्कामोर्तब …
महात्मा गांधी जयंती निमित्त जावली तालुक्यातील सावली गावात स्वच्छतेचा जागर .. लहान मुलांसह ग्रामस्थांनी स्वच्छ केला गाव व परिसर ..
केळघरचे सुपुत्र युवा उद्योजक समाजसेवक श्री राजेंद्र धनावडे (भाऊ) उत्कृष्ठ समाजसेवक पुरस्काराने सन्मानित ..
सभासद – शेतकयांच्या सहकार्यामुळेच ‘ अजिंक्यतारा ‘ ची घोडदौड आ . शिवेंद्रसिंहराजे भोसले .. कारखान्याची ४१ वी वार्षिक सभा उत्साहात सपन्न …
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर ..
इस्त्रायल शास्त्रज्ञ मिखाल याकीर यांची कास पठारला भेट ..
गोदवलेच्या राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवात ‘ पौर्णिमा प्रथमः इम्रान मोमीन सर्वोत्कृष्ठ दिग्दर्शक, सोनाली ओंबळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वैष्णवी जाधव सर्वोत्कृष्ठ बालकलाकार तर निलेश गुरव सर्वोत्कृष्ठ ..
Scroll To Top