Skip to content

महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार .. बावनकुळे … साताऱ्यासह ४५ जागा निवडुन आणणार .. पालकमंत्री बदल ठरल्याप्रमाणेच ..

IMG-20231004-WA0361

News By - Narayan Jadhav

*महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार: बावनकुळे*
*सातार्‍यासह ४५ जागा निवडून आणणार, पालकमंत्री बदल ठरल्याप्रमाणेच*
*सहयाद्री न्युज स्टार ११*
सातारा / प्रतिनिधी . महायुतीच्या प्रत्येक घटकाला उमेदवारी सांगण्याचा अधिकार परंतु, कोणाला कोणती जागा मिळेल हा अधिकार पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार ठरवतील. जागा कोणालाही मिळो, भाजप आपली ताकद लावेल आणि ४५ जागा निवडून आणणार, पूर्ण ताकद लावणार भाजप मोठा भाऊ म्हणून महायुतीच्या विजयाची जबाबदारी भाजप घेणार असून सातारा लोकसभा महायुतीचीच निवडून येणार, असल्याचा ठाम दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
पालकमंत्रीपद ठरल्याप्रमाणेच
पालकमंत्री बदलाबाबत सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे, जे ठरलं होतं तेच झालं आहे. नवीन पालकमंत्री मिळाल्यामुळे अधिक परफॉर्मन्स आणि वेगवेगळ्या योजना योजना यामधून चालना मिळणार आहे. अशी अशी प्रतिक्रिया पालकमंत्री बदलावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आज नव्याने ११ जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीबाबत श्री. बावनकुळे म्हणाले, पालकमंत्री जादा मिळाल्याने जिल्ह्यांना विकासकामात न्याय मिळेल. अजित पवार कधीही नाराज नव्हते, ते कधीही नाराज होत नसतात. या निवडीत राजकीय रंग आणू नये. एका व्यक्तीवर ४ जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती, आता प्रत्येकाला वेगळी जबाबदारी मिळाल्याने विकास कामे गतीने होतील.
बच्चू कडूंच्या नाराजीवर ते आमचे चांगले मित्र आहेत भाजपचा त्रास त्यांना होणार नाही असं सांगताना घटक पक्षांना जेवढं मोठ स्थान आमच्याकडे आहे तेवढं कुणाकडेच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तर जनगणनेचा अधिकार केंद्र सरकारचा. राज्यांनी डेटा तयार करावा हा राज्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
सातारा लोकसभा प्रचंड मतांनी जिंकणे हे ध्येय. ६०० घरी ६०० वॉरियर जाणार आहेत. संपर्क ते समर्थन. पुढच्या दोन महिन्यात साडेतीन लाख घरी मोदी सरकारच्या सर्व योजना पोचवण्याचे काम करणार असल्याचे सांगत ४५जागा जिंकणार असल्याचा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे
केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे 
वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..
आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
आंबेघर येथील प्रतिपंढरपुर विठ्ठलधाम मध्येही दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
सातारा – जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख .. आ शिवेद्रराजेचा पाठपुरावा ; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी ..
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .
डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
आंबेघर ते आसणीतळ दरम्यानच्या रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण ..
Scroll To Top