Skip to content

बोंडारवाडी धरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा नाही … बोंडारवाडी धरण कृती समिती पुणे विभाग व जावली युवा प्रतिष्ठाण पुणे विभागाच्या वतीने शपथ घेण्यात आली .

Screenshot_2023-09-10-22-29-13-82_40deb401b9ffe8e1df2f1cc5ba480b12

News By - Narayan Jadhav

बोंडारवाडी धरण जो पर्यंत होत नाही तो पर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठींबा नाही ..
*सह्याद्री न्युज स्टार ११*
केळघर (नारायण जाधव )
बोंडारवाडी धरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देणार नाही असे पुणे विभागाचे वतीने शपथ घेणेत आली दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी जलनायक स्व. विजयरावजी. मोकाशी साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन व धरणाच्या सद्यस्थिती बाबत आढावा घेण्यासाठी रविवार दि १०/ ०९/ २०२३ रोजी बोंडारवाडी धरण कृती समिती पुणे विभाग व जावली युवा प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने पुणे येथे मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.
      केळघर येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. तसेच जनजागृती साठी प्रत्येक गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी बोंडारवाडी धरण कृती समितीचे बॅनर लावण्यात यावेत व ती जबाबदारी प्रत्येक गावातील मंडळातील सभासद व ग्रामस्थांनी घ्यायचे ठरले. आपल्या शेजारील सोळशी धरणाचा लढा मागून चालू होवून पुर्ण होणाच्या मार्गावर आहे. तरी बोंडारवाड़ी धरणाला उशीर का होतोय ? असा प्रश्न सभासदांनी उपस्थित केला. त्यामध्ये प्रशासकीय दिरंगाई व सरकारची इच्छाशक्तीची कमतरता कमी पडत असेल तर जोपर्यंत धरण होणार नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला पुणे विभागाच्या वतीने पाठिंबा दिला जाणार नाही अशी शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक प्रकाश शेलार  यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुणे विभागाचे निमंत्रक आनंदा जुनघरे यांनी केले. वैभव ओंबळे  यांनी धरणाच्या सद्यस्थितीबाबत व केळघर येथे होणाऱ्या मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी मुंबई विभागातून  एकनाथ ओंबळे , नारायण सुर्वे, विश्वनाथ धनावडे , विष्णू धनावडे , जनार्दन मोरे तसेच जावली प्रतिष्ठानचे सर्व सभासद व महिला मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते. पुणे विभागातील एकनाथ सपकाळ,नारायण धनावडे , ज्ञानदेव शेलार , महेंद्र पार्टे, विकास जुनघरे, व इतर सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार अजय धनावडे यांनी मानले

बातमी शेयर करा :

थोडक्यात महत्वाचे

आ शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातुन नांदगणे पुनवडी पुलासाठी ५ कोटींहुन अधिक निधी मिळाला असुन पुलाचे काम अंतिम टप्यात आहे
केळघर परिसरासह घाटमाथ्यावर पावसाची जोरदार बॅटिंग , वेण्णा नदी पात्र दुथडी भरुण वाहत आहे 
वाघनखं अनावरण सोहळ्याला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा आ. शिवेंद्रसिंहराजे; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमवेत सर्किट हाऊस ते संग्रहालय रॅलीचे आयोजन ..
आंबेघरमध्येही प्रतिपंढरपूर विठ्ठलधाम दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा.
आंबेघर येथील प्रतिपंढपूर विठ्ठलधाममध्ये दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
आंबेघर येथील प्रतिपंढरपुर विठ्ठलधाम मध्येही दणक्यात साजरा होणार आषाढी एकादशीचा सोहळा ..
सातारा – जावलीतील २६ ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामासाठी ५ कोटी २० लाख .. आ शिवेद्रराजेचा पाठपुरावा ; राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून मिळवला निधी ..
शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी १५ कोटी निधी मंजुर . आ . शिवेंद्रसिंहराजेच्या पाठपुराव्याला यश.. . उभारणीचे काम लवकरच होणार सुरु .
डांगरेघर येथील मित्रमेळा फाऊंडेशन जावली व न्यु अजिंक्य क्रिकेट क्लब ,ग्रामपंचायतीच्या वतीने १००० पेक्षा जास्त वृक्षलागवड करून एक वेगळा आदर्श निर्माण केला
आंबेघर ते आसणीतळ दरम्यानच्या रामजीबाबा पुलाच्या बाजुने वाढलेल्या भवस गवताने आपघातास निमंत्रण ..
Scroll To Top